महाराष्ट्र ग्रामीण

मोबाईलवर खेळू न दिल्याने विद्यार्थ्यांची आत्महत्या ;अंबरनाथ

आत्महत्येचा प्रकार कळताच पालकांना धक्का मूलगा मोबाईलमध्ये बेटल ग्राउंड प्रकारातील खेळ खेळत असल्याची माहिती पालकांनी दिली आहे.

मोबाईल आणि त्यावर गेम खेळण्याचे वेड मुलांच्या जीवावर बेतले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . मोबाईलवर खेळू नको ,दहावीचे वर्ष आहे , असे सांगितल्याने एका दहावीच्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अंबरनाथ येथील नेवाळी येथील विभागात  हा प्रकार उघडकीस आला आहे.

नेवाळी येथे एका सोळा वर्षीय दहावीच्या मुलाला त्याचा आई वडिलांनी मोबाईल वर जास्त वेळ गेम खेळू नको , असा सल्ला दिला होता. तो दिवसभर मोबाईलमध्ये गेम खेळत असायचा इयत्ता दहावीत असल्यामुळे एक्स्ट्रा क्लास व शिकवणी वर्ग सुरू होते. त्यामूळे आई वडिलांनी मोबाईल थोडे दिवस बाजूला ठेव ,बंद कर असे सांगितल्यामुळे त्याला त्या गोष्टीचा राग आला. त्यावेळी त्याने संयम बाळगला दुसऱ्या दिवशी आई वडिल नोकरी निमित्त घराबाहेर गेल्यावर मुलाने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.

मुलाच्या आत्महत्येचा प्रकार कळताच आई वडिलांनी मोठा धक्काच बसला. याप्रकरणाची माहिती मिळताच हिललाईन पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.व मुलाची आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button