महाराष्ट्र ग्रामीण

सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

प्रथम न्याय मगच अंत्यविधी

अंबरनाथ मध्ये सासरच्या लोकांना कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे आत्महत्ये पूर्वी महिलेने आपल्यावर होत असलेल्या अत्याचार या विरोधात व्हिडीओ काढून आपल्या बहिणींना पाठवला व गळफास घेत आपले जीवन संपवले ,विधी राजेंद्र गायकवाड असे या मृत विवाहितेचे नाव असून त्यांचे पती राजेंद्र गायकवाड याच्याशी दोन हजार तेरा रोजी लग्न झाले होते त्यांचे पती आघाती देशामध्ये नोकरीला असून ते सासू सासरे दीर आणि भाऊजई यांच्या सोबत अंबरनाथ पूर्व विभाग रॉयल पार्क मध्ये वास्तव्याला राहत होते मात्र मागील काही दिवसांपासून सासरचे लोक त्यांचा छळ करत होते यांच्या छळाला कंटाळून अखेर विधी यांनी टोकाचे पाऊल उचलले.शनिवारी सकाळी आपल्याला कशाप्रकारे त्रास दिला जातो,  हे व्हिडिओ च्या माध्यमातून त्यात सांगितले व तो व्हिडिओ आपल्या बहिणींना पाठवला. व त्यानंतर लगेचच गळफास लावून आपले जीवन संपवले. हा व्हिडिओ पाहताच त्यांच्या बहिणींनी विधी यांना फोन केले असता काहीच प्रतिसाद न मिळाल्याने  बहिणींनी विधी यांच्या सासरी धाव घेतली असता, बहिणींने आत्महत्या केल्याचे समोर आले. यानंतर विधीने सासरच्या होत असलेल्या त्रासामुळे आत्महत्या केली असे समोर आले,  विधी यांच्या माहेरच्यांनी लगेचच अंबरनाथ शिवाजी नगर पोलीस ठाण्यात धाव घेत सासरच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.‌

पोलीसांनी काही कारणास्तव गुन्हा दाखल न केल्यामुळे विधी यांच्या माहेरच्यांनी जो पर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही विधी यांचे अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका आहे.  घटनास्थळी प्रसार माध्यमांनी  धाव घेतली असता पोलिसांनी लगेचच गुन्हा दाखल केला.विधि यांच्या माहेरच्यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार करत विधी यांच्या सासरच्या मंडळींना‌ जो पर्यंत अटक करुन आम्हाला योग्य न्याय मिळत नाही  तोपर्यंत आम्ही विधी यांचे अंत्यसंस्कार करणार नाही असे सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button