महाराष्ट्र ग्रामीण
अंबरनाथ पोलिस प्रशासनाच्या अथक प्रयत्नांना यश

अंबरनाथ : खुंटवली शिवलिंग नगर खामकर वाडी परिसरातील गेली ४ दिवसांपूर्वी न सांगता निघून गेलेली मुले सागर गावित व साहिल मिश्रा अखेर अंबरनाथ पोलिस प्रशासनाच्या अथक प्रयत्नामुळे कल्याण बसस्टॉप परिसरात सापडली. न सांगता निघून गेलेल्या मुंलाचा पोलिस प्रशासनाने योग्य रित्या पाठपुरावा करून व समझ देऊन मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. तसेच पालकांनी अंबरनाथ पोलिस प्रशासनाचे आभार व्यक्त केले.